India Vs Pakistan | सिंधू नदीत पाणी वाहील नाहीतर भारतीयांचं रक्त, Bilawal Bhutto यांची भारताला धमकी
भारताने सिंधू पाणीवाटप करार रोखल्यावर पाकिस्तानात खळबळ पाकिस्तानी नेत्यांची चिथावणीखोर भाषा सुरू पाकिस्तान पिपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुत्तोंची भारताला धमकी सिंधू नदीत पाणी वाहील नाहीतर भारतीयांचं रक्त- भुत्तो सिंधू नदी आमची होती, आमचीच राहील - भुत्तो
भारतानं पाणी अडवलं तर संपूर्ण ताकदीनिशी प्रत्युत्तर देऊ पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची दर्पोक्ती भारताच्या प्रत्येक हल्ल्याला तोडीस तोड उत्तर देण्याची भाषा लष्कराच्या कार्यक्रमात शाहबाज शरीफ यांच्या बढाया भारताच्या सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्यानं पाकिस्तान बेचैन बिलावल भुत्तोही म्हणाला, सिंधूत पाणी नसेल तर रक्त वाहील'...खाण्यापिण्याचे वांधे असलेल्या पाकिस्तानकडून भारताच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीनं धमक्या दिल्या जातायत. पंतप्रधान आणि लष्करप्रमुखांच्या बेताल वक्तव्यातून पाकिस्तानची बेचैनी दिसून येत आहे. सिंधू नदीचं पाणी अडवल्यामुळं पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला जाणार असल्यानं पाकिस्तानी नेते अशी वक्तव्यं करत आहेत..